Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»महाराष्ट्र»उघड्या विहिरींचा सापळा; निष्पाप जीवांचा बळी आणि प्रशासनाची जबाबदारी?
महाराष्ट्र

उघड्या विहिरींचा सापळा; निष्पाप जीवांचा बळी आणि प्रशासनाची जबाबदारी?

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मागील दहा महिन्यांत राज्यात उघड्या आणि असुरक्षित विहिरींमुळे घडलेल्या भीषण अपघातांनी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. रस्त्यालगत संरक्षण भिंत किंवा सुरक्षितता उपाययोजना नसलेल्या विहिरींमध्ये वाहने कोसळून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या घटनांमुळे प्रशासनाच्या देखरेख आणि सुरक्षाविषयक नियमांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पहिली घटना 29 ऑगस्ट 2025 रोजी जालना जिल्ह्यात घडली. चालकाने सकाळी फिरण्यासाठी निघालेल्या दोन पादचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना वाहनावरील नियंत्रण सुटले. कार रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीला धडकून जाफराबाद तालुक्यातील गडेगाव्हाण गावाजवळील सुमारे 70 ते 80 फूट खोल विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दुसरी घटना 3 एप्रिल 2026 रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे घडली. एका कार्यक्रमावरून परतणारे एका कुटुंबातील नऊ सदस्य, ज्यामध्ये सहा लहान मुलांचा समावेश होता, अर्टिगा वाहनातून प्रवास करत होते. वाहन रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत कोसळले आणि सर्व नऊ जणांचा मृत्यू झाला.

आता पुन्हा अशाच प्रकारच्या दुर्घटनेने सुरक्षेच्या प्रश्नाला ऐरणीवर आणले आहे. विहीर खोदण्यासाठी विविध शासकीय परवानग्या आवश्यक असतात. तसेच विहीर पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणांकडून तपासणी व आवश्यक प्रमाणपत्रे दिली जातात. मग रस्त्यालगत संरक्षण भिंत नसलेल्या किंवा सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था नसलेल्या विहिरी अस्तित्वात कशा राहतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी होत नसल्यामुळे अशा धोकादायक विहिरींकडे दुर्लक्ष होते. दुर्घटना घडल्यानंतर चौकशी, पंचनामे आणि मदतीच्या घोषणा होतात; मात्र जीव गमावलेल्या कुटुंबांचे नुकसान कधीच भरून निघू शकत नाही. शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत ही मानवी जीवाची किंमत ठरू शकत नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी राज्यभरातील रस्त्यालगतच्या उघड्या विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करून संरक्षण भिंती बांधणे, इशारा फलक लावणे आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व मालकांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा अशा दुर्घटना पुन्हा घडत राहतील आणि निष्पाप जीवांचा बळी जात राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

शेतकऱ्याचा सवाल

July 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

July 9, 2026

ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधन नियमित अदा होणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

July 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 16, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘इंडिया स्किल्स…

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

अमृत-सक्षम’ उपक्रमाद्वारे कचरा व्यवस्थापनात उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.