Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»‘पुरुषस्य भाग्यम्’ कादंबरीचे दिमाखदार प्रकाशन; भव्य कवी संमेलनात साहित्यरसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर

‘पुरुषस्य भाग्यम्’ कादंबरीचे दिमाखदार प्रकाशन; भव्य कवी संमेलनात साहित्यरसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 8, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर जुलै2026 | (प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
गीता भवन, एन-५ सिडको येथे सुप्रसिद्ध साहित्यिक माधव मनोहर जोशी लिखित “पुरुषस्य भाग्यम्” या बहुचर्चित कादंबरीचा प्रकाशन सोहळा आणि भव्य कवी संमेलन आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. साहित्य, संस्कृती आणि कवितेचा सुरेख संगम अनुभवण्यासाठी शहरातील साहित्यप्रेमी, कवी, लेखक, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी कुलगुरू, प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर यांच्या शुभहस्ते झाले. प्रा. धारूरकर यांनी आपल्या भाषणात साहित्य हे समाजाचे विचारविश्व समृद्ध करणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी वाचन संस्कृती अधिक बळकट होण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. विविध शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे ते एक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात.
यावेळी प्रमुख पाहुणे सुधीर कोर्टीकर यांनी साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत नवोदित लेखक आणि कवींनी सामाजिक भान जपत दर्जेदार लेखन करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या भव्य कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ हास्यकवी प्रा. विजय पोहनेरकर होते. त्यांनी मराठी कवितेची समृद्ध परंपरा, विनोद, सामाजिक आशय आणि नव्या पिढीतील साहित्यिकांनी आपल्या कार्यातून संदेश दिला आहे . त्यांच्या ओघवत्या शैलीने उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी “पुरुषस्य भाग्यम्” या कादंबरीचे लेखक माधव मनोहर जोशी यांनी आपल्या साहित्यनिर्मितीमागील प्रेरणा, सामाजिक अनुभव आणि कादंबरीचा आशय उलगडून सांगितला. जीवनसंघर्ष, मानवी नातेसंबंध आणि नियती यांचे वास्तववादी चित्रण या कादंबरीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पुस्तकाचे प्रकाशन ज्योतिर्मय प्रकाशन, पुणे यांच्या वतीने करण्यात आले. प्रकाशन संस्थेचे संजय काशिनाथ व्यापारी यांनी गुणवत्तापूर्ण साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आपला सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे सांगितले.
कवी संमेलनात अनेक नामवंत तसेच नवोदित कवींनी विविध विषयांवरील कविता सादर करून रसिकांची भरभरून दाद मिळवली. सामाजिक जाणीवा, देशप्रेम, निसर्ग, मानवी नाती, अध्यात्मिक, जात्यावरच्या ओव्या आणि संस्कार या विषयांवरील काव्यरचना विशेष गाजल्या.
यावेळी एका योगराज या लहान विद्यार्थ्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अत्यंत प्रभावी कविता सादर केली. “मोबाईलपासून दूर राहा, पुस्तके वाचा, स्वतः कविता लिहा आणि सर्जनशीलतेला वाव द्यायला हवा” असा संदेश त्या मुलाकडून मिळाला,उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. भविष्यातील पिढीने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत साहित्य, वाचन आणि लेखनाकडे वळावे, असा प्रेरणादायी संदेश प्रकाशक संजय व्यापारी यांनी दिला व सर्व शिक्षकांना आवाहन केले की आपल्या शाळेतील मुलांना आपापल्या कल्पनेप्रमाणे लेखनासाठी प्रेरित करा. विशेष म्हणजे त्यांचे लिखाण आपल्या ज्योतिर्मय दैनिकात कुठलाही मोबदला न घेता प्रसिद्ध करण्याची जबाबदारी घेतली आहे.

कार्यक्रमाला साहित्य, शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थित साहित्यप्रेमींनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पुस्तक प्रकाशन आणि कवी संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्वाला नवसंजीवनी देणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील.

महाराष्ट्र निवास टाइम्स
संपादक-दिनेश गायके

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 16, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘इंडिया स्किल्स…

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

अमृत-सक्षम’ उपक्रमाद्वारे कचरा व्यवस्थापनात उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.